Tuesday 28 July 2015

My homage to KALAM SIR

आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी हैदराबाद येथे दिलेल्या व्याख्यानाचे (काही भागाचे) मराठी भाषांतर:

हे भाषण वाचण्यासाठी कृपया आपल्या अमूल्य वेळामधील १० मिनिटांचा वेळ जरूर काढावा हीच विनंती.

================================

आपल्याकडची प्रसारमाध्यमे एवढी नकारात्मक का असतात?

भारतामध्ये आपल्याला आपल्याच क्षमता आणि उपलब्धता ओळखण्यात कमीपणा कां वाटतो? आपला देश खूप महान आहे. आपल्याकडे कितीतरी आपली यशोगाथा सांगतील अश्या गोष्टी आहेत पण आपणच त्यांची दखल घेत नाही. असं कां?

दुग्ध व्यवसायात आपला जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक लागतो. आपण रिमोट सेन्सिंग उपग्रह तयार करण्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकावर आहोत. गव्हाचे आणि तांदुळाचे उत्पादन यात जागतिक क्रमवारीत आपला द्वितीय क्रमांक लागतो. डॉ सुदर्शन यांच्या कडे बघा, त्यांनी एका आदिवासी खेड्याचे रूपांतर एका स्वबळावर आणि स्वयं प्रेरणेवर चालणाऱ्या चांगल्या गावात केलं आहे.

अश्या उपल्ब्धतांची आपल्याकडे लक्षावधी उदाहरणे आहेत पण प्रसार्माध्यामना फक्त वाईट बातम्या, अपयश आणि आपत्ती या सगळ्याचच आकर्षण आहे.

मी तेल अवीव मध्ये असताना तिथले वर्तमानपत्र वाचत होतो. त्याच्या आदल्याच दिवशी तिथे खूप बोंब हल्ले झाले होते आणि त्या हल्य्यात खूप व्यक्ती मरण पावल्या होत्या. ते हल्ले हमास या अतिरेकी संघटनेने केलेले होते. पण त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर अश्या एका जू गृहस्थाच चित्र होतं कि ज्याने पाच वर्षांत वाळवंटात बाग फुलवून हिरवाई निर्माण केली होती. या प्रेरणादायी चित्राने सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात त्या वृत्तपत्राने करून दिली होती. बोंब हल्ले आणि त्यात मेलेली माणसे, हल्ले कसे झाले त्याविषयीच्या कथा हे सगळे आतील पानांवर इतर बातम्यांमध्ये प्रकाशित केले होते.
भारतामध्ये आपण वृत्तपत्रांमध्ये रोज फक्त पहिल्या पानांवर मृत्यू, दहशतवाद, गुन्हे, आजारपणे अश्याच बातम्या वाचतो. आपण इतके नकारात्मक कां आहोत?
आजून एक प्रश्न: एक देश म्हणून आपल्याला कायम परदेशी वस्तूंचे आकर्षण कां आहे? आपल्याला परदेशातील टी व्ही हवेत, परदेशी कपडे हवेत. आपल्याला परदेशी तंत्रज्ञान हवे. एवढ्या आयात केलेल्या वस्तूंचे आपल्याला आकर्षण कां आहे? आपल्या हे लक्षात कसे येत नाही कि स्वाभिमान हा स्वयंपूर्णते मधून येत असतो. मी हैदराबाद मध्ये एक व्याख्यान देण्यासाठी गेलो असताना एका १४ वर्षांच्या मुलीने मला स्वाक्षरी मागितली. मी तिला तिच्या आयुष्यातील ध्येय विचारलं. टी उत्तरली: मला प्रगत भारतात राहायचं आहे. तिच्यासाठी तुम्हाला आणि मला प्रगत भारताची निर्मिती करायची आहे. तुम्ही घोषणा केलीच पाहिजे. भारत हा काही अप्रगत देश नाही, तर तो एक प्रगत देश आहे.

तुमच्या कडे १० मिनिटे आहेत? मला काही कटू सत्य घेऊन तुमच्या समोर येऊ द्यात. आहेत कां तुमच्याकडे तुमच्या देशासाठी १० मिनिटे? जर असतील तरच पुढे वाचा, पर्याय तुम्ही निवडायचा आहे.
तुम्ही म्हणता कि आपलं शासन तत्पर नाही.

तुम्ही म्हणता कि आपले कायदे खूप जुने आहेत.

तुम्ही म्हणता कि नगरपालिका कचरा उचलत नाही.

तुम्ही म्हणता कि दूरध्वनी काम करत नाहीत, आपल्याकडे रेल्वे हा एक विनोद आहे. हवाईमार्ग सेवा तर अत्यंत वाईट आहे, कोणतीही पत्र वेळेवर आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचत नाहीत.

तुम्ही म्हणता कि आपला देश हा एक कुत्र्याचे जेवण आणि एक मोठी कचराकुंडी आहे. तुम्ही म्हणता.... म्हणता आणि म्हणता......पण त्यासाठी तुम्ही काय करता?

समजा एक सिंगापूरला जाणारा प्रवासी आहे. त्याला "तुम्ही" हे नाव द्या. त्याला तुमचा चेहरा द्या. आता तुम्ही विमानतळाच्या बाहेर पडता आहात आणि तुम्ही अंतर राष्ट्रीयस्तरावरील उत्तम व्यक्ती आहात. सिंगापूर मध्ये तुम्ही रस्त्यावर सिगारेटचे थोटूक फेकत नाही आणि रस्त्यावर असलेल्या दुकानात खात पण नाही. तुम्हाला त्यांच्या इतकाच त्यांच्या जमिनीखालील रेल्वे चा अभिमान आहे. तुम्ही साधारणपणे संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान Orchard Road वरून (आपल्या माहीम कॉजवे किंवा पेडर रोड सारखा) वाहन चालविण्यासाठी $५ (अंदाजे रू. ६०/-) खर्च देता. जर तुम्ही एखाद्या उपहारगृहात किंवा खरेदीच्या मोठ्या दुकानात अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबला असाल तर स्वतःचा हुद्दा किंवा स्वतःचे समाजातील स्थान याची ओळख करून न देता वाहनतळा मध्ये येऊन जास्तीचे तिकीट काढता. सिंगापूर मध्ये तुम्ही काही सुद्धा बोलत नाही. हो कि नाही?
दुबई मध्ये रमादानच्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी खाण्याची हिम्मत पण तुम्ही करणार नाही.

जेद्दाह मध्ये तुमच्या डोक्याला फडकं बांधल्याशिवाय तुम्हीबाहेर जाण्याची हिम्मत करणार नाही.

तुम्ही लंडन मध्ये दूरभाष केंद्रातील एखाद्या व्यक्तीला आपल्याएस टी डी आणि आय एस डी कॉल्स चे बिल दुसर्याच्या नावे पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी १० पौंड (अंदाजे रू. ६५०/-) लाच देण्याची हिम्मत करणार नाही.

तुम्ही washington मध्ये गाडी चालवताना ५५ मैल प्रती तास (८८ km /hr ) हा वेग न पाळण्याची हिम्मत करणार नाही आणि जर तो न पाळताना पकडले गेलात तर वाहतूक पोलीसाला तुला माहित नाही कां मी कोण आहे ते? मी अमक्या अमक्याचा मुलगा आहे. तुझे दोन पौंड घे आणि गप्प बस. असं बोलण्याची हिम्मत करणार नाही.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये तुम्ही नारळाच्या रिकाम्या करवंट्या कचराकुंडी शिवाय इतरत्र फेकायची हिम्मतच करणार नाही. टोकियोच्या रस्त्यावर तुम्ही तोंडातील पानाची पिंक कां टाकत नाही? बोस्टन मध्ये तुम्ही परीक्षेत कॉपी कां करत नाही, तसेच खोटी प्रमाणपत्रे पण कां मिळवत नाही? आपण अजुनही त्या तुम्ही या व्यक्ती विषयीच बोलत आहोत.

तुम्ही परदेशातील व्यवस्था पाळता त्यांचा आदर करता मग आपल्या देशातील व्यवस्थांच्या बाबतीत कां नाही? ज्या क्षणी तुम्ही भारताच्या भूमीवर पाय ठेवता त्या क्षण पासून कागद आणि सिगारेटची थोटक तुम्ही रस्त्यावर टाकायला सुरुवात करता. जर तुम्ही एका अनोळखी देशाचे मान्यवर नागरिक म्हणून वावरू शकता तर तेच तुम्ही भारत देशाचे कां नाही बनत?

एकदा एका मुलाखतीच्या वेळी मुंबईतील माजी महापालिका आयुक्त श्री Tinaikar यांनी एक मुद्दा मांडला होतं. "श्रीमंत लोकांची कुत्री रस्त्यावरून त्यांची अमूल्य अशी सामग्री सगळीकडे टाकत जातात." ते म्हणाले " आणि नंतर हेच लोक मागाहून अधिकाऱ्यांना दोष देतात कि ते तत्पर नाहीत, रस्ते घाण असतात. अधिकाऱ्यांकडून त्यांची अपेक्षा तरी काय आहे? प्रत्येक वेळी जेंव्हा त्यांच्या कुत्र्याला बहिर्दीशेला जायची इच्छा होईल तेंव्हा हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरावे काय? अमेरिका मध्ये प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला त्याच्या कुत्र्याने शी केल्यावर ती ताबडतोब स्वच्छ करण्याचे नियमच आहेत. अगदी जपान मध्ये सुद्धा तेच नियम आहेत. भारतीय नागरिक हे करतील काय?" त्यांचं बरोबर आहे. आपण सरकार निवडण्यासाठी मतदान करतो आणि नंतर आपल्या जबाबदारी पासून पळून जातो.

आपण मागे बसून लाड करून घेण्याची आणि शासनानेच सगळं करण्याची वाट बघत असतो, आणि आपला सहभाग केवळ नकारात्मकच असतो. आपण शासनाकडून स्वचातेची अपेक्षा करतो पण आपण रस्त्यावर कचरा टाकण्याचे कधीच थांबवणार नाही आणि रस्त्यावर पडलेला कागदाचा तुकडा उचलून कचऱ्याच्या टोपलीत कधीच टाकणार नाही. आपण रेल्वे कडून स्वच्छ अश्या स्वच्छतागृहांची अपेक्षा करतो पण आपण स्वच्छतागृहांचा योग्यरित्या वापर करायला कधीच शिकणार नाही. आपल्याला इंडिअन एअर लाईन्स व एअर इंडिया कडून उत्तम जेवण आणि स्वच्छतागृहांची अपेक्षा करतो पण आपण चोरी करण्याची एक सुद्धा संधी सोडणार नाही.

हे अगदी सेवक वर्गाला सुद्धा लागू आहे कि ज्यांना त्या सेवा सार्वजनिक करण्याची मुभा नाही. जेंव्हा आपल्या समोर मुली आणि स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, हुंडाबळी या सारखे ज्वलंत प्रश्न येतात तेंव्हा आपण मोठ्याने त्यांचा सार्वजनिकरित्या निषेध व्यक्त करतो पण स्वतःच्या घरात त्याच्या बरोबर उलट वागतो. या मागचं आपलं कारण काय? "सगळी व्यवस्थाच बदलायला हवी. मी एकट्यानेच माझ्या मुलाचा हुंडा घेण्याचा हक्क कां सोडायचा? मी एकट्याने बदलून काय फरक पडणार?". मग, कोण बदलणार ही व्यवस्था? एखाद्या व्यवस्थे मध्ये नेमकं कोण असतं? अतिशय सोयीस्कररित्या या व्यवस्थे मध्ये आपण सोडून सगळे असतात. आपले शेजारी, इतर घरे, इतर शहरे, इतर समाज आणि शासन. पण तुम्ही आणि मी नक्कीच नाही.

पण जेंव्हा आपल्यावर काही सकारात्मक योगदान देण्याची वेळ येते तेंव्हा आपण आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि दूर असलेल्या देशांकडे पाहतो. आणि कोणीतरी श्री सभ्य येतील आणि आपल्यासाठी त्यांच्या जादूच्या हातानी जादुई काम करतील याची वाट बघत बसतो किंवा आपण या देशाला सोडून आणि पळून जातो. एखाद्या आळशी माणसासारखे, एखाद्या कुत्र्याच्या भीतीने जीव खाऊन पळाल्यासारखे आपण अमेरिका या देशात जातो आणि त्यांच्या वैभवाचे, त्यांच्या व्यवस्थेचे गोडवे गायला लागतो. पण तेच न्यूयॉर्क जेंव्हा असुरक्षित बनते तेंव्हा आम्ही तिथून सुद्धा पळून जातो आणि इंग्लंड मध्ये येतो. जेंव्हा इंग्लंड मध्ये बेकारी अनुभवतो तेंव्हा आपण ताबडतोब पुढची विमानसेवा पकडून तिथून बाहेर पडतो गल्फ मध्ये जाण्यासाठी. जेंव्हा गल्फ मध्ये युद्ध होतं तेंव्हा आपण भारत सरकार कडून संरक्षणाची आणि परत स्वगृही आणण्याची मागणी करतो. प्रत्येकजण आपल्या देशाला दूषणे देणे आणि त्याचे वस्त्रहरण करणे एवढेच करतो. कोणी आपल्या व्यवस्थेला उर्जितावस्था आणण्याविषयी विचार करत नाही. आपलं मन, बुद्धी फक्त पैशाशी जोडलेली आहे.

प्रिय भारतीयांनो,

मी जे एफ केनेडी यांनी त्यांच्या अमेरिकेतील बांधवाना उद्देशून उच्चारलेल्या शब्दांचा भारतीयांच्या संदर्भात पुनरुच्चार करतो..........

" विचारा कि तुम्ही भारता साठी काय करू शकता?"

चला अश्या गोष्टी करू ज्यांची भारताला गरज आहे.

धन्यवाद!

डॉ अब्दुल कलाम

हा लेख खूपच विचार प्रवर्तक आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज किती आहे तसेच एखाद्याच्या मनाला साद घालणारा आहे.

शांतीसुधा (Shantisudha)

Monday 20 July 2015

Jokes

*कोंबडीचे लग्न गरुडा
  बरोबर होत असते.
*त्यावर कोंबडा
  बोलला, मी काय
  मेलो होतो का?
*कोंबडी म्हणाली,
  आईवडीलांची इच्छा
  होती,एक तरी जावाई
  एअरफोर्स मधला
  असावा..!!

Admin : काल मी मोबाइल रिचार्जवाल्याला ­फसवलं...

Mi : कसं काय?

Admin : त्याला शंभर रुपये दिले आणि मोबाइल नंबरच चुकीचा सांगितला! ­ ­!

खतरनाक ब्रेक अप

मुलगी - तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा रहायची

.
.
.
मुलगा - अग व्हीम बार साबनान तोंड धुनारी तु.......
आमच्या घरात भांडी घासायला पण DOVE वापरतात.........




गुरुजी - झंप्या सांग डॉक्टरांच्या दवाखान्यावर +चिन्ह असते,त्याचा काय अर्थ ?

झंप्या - गुरुजी,उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट असा त्याचा अर्थ आहे...

मास्तरांना फिट आली....... ������

कोण सांगणार?

घर म्हणजे भिंती नव्हेत
हे बिल्डरला सांगणार कोण?
आयुष्य म्हणजे हिशेब नाही हे
सी.ए. ला सांगणार कोण?

जीवन म्हणजे कोर्ट नाही हे
वकिलास सांगणार कोण?
हृदय म्हणजे केवळ अवयव नाही हे
वैद्यकास सांगणार कोण?

बेदरकार वागण्यात तारुण्य नाही
हे तरुणास सांगणार कोण?
केवळ वयात मोठेपणा नाही हे
ज्येष्ठास सांगणार कोण?

तुलाही आहेत आईवडील हे
तरुण सुनेस सांगणार कोण?
एक लेक तुम्हासही आहे हे
सासूस सांगणार कोण?

देव म्हणजे मूर्ती नव्हे हे
पुजाऱ्यास सांगणार कोण?
डोळ्यातले पाणी हे पाणी नव्हे
हे कोरड्यास सांगणार कोण?

Sunday 19 July 2015

Add life to days. Not days to life

Are we earning to pay builders and interior designers, caterers and decorators? 

Whom do we want to impress with our highly inflated house properties & fat weddings?

Do you remember for more than two days what you ate at someone's marriage?

Why are we working like dogs in our prime years of life?

How many generations do we want to feed?

Most of us have two kids. Many have a single kid.

How much is the "need" and how much do we actually "want"??
Think about it.

Would our next generation be incapable to earn, that we save so much for them!?!

Can not we spare one and a half days a week for friends, family and self??

Do you spend even 5% of your monthly income for your self enjoyment?
Usually...No.

Why can't we enjoy simultaneously while we earn?  

Spare time to enjoy before you have slipped discs and large prostates.

We don't own properties, we just have temporary name on documents.

GOD laughs sarcastically, when someone says,
"I am the owner of this land"!!   

Do not judge a person only by the length of his car.

Many of our science and maths teachers were great personalities riding on scooters!!   

It is not bad to be rich, but it is very unfair, to be only rich.

Let's get a LIFE, before life gets us, instead....
.......
Wake up

Job sites

All job sites....
From whatsapp

www.careerbuilder.co.in

www.clickjobs.com

www.placementpoint.com

www.careerpointplacement.com

www.glassdoor.co.in

www.indtherightjob.com

www.employmentguide.com

www.JOBSTREET.com

www.JOBSDB.com

www.AE.TIMESJOBS.com

www.NAUKRIGULF.com

www.NAUKRI.com

www.GULFTALENT.com

www.BAYAT.com

www.MONSTER.com

www.VELAI.net

www.CAREESMA.com

www.SHINE.com

www.fresherslive.com

www.jobsahead.com

www.BABAJOBS.com

www.WISDOM.com

www.indeed.co.in

www.sarkarinaukriblog.com

www.jobsindubai.com

www.jobswitch.in

www.jobs.oneindia.com

www.freshersworld.com

www.freejobalert.com

www.recruitmentnews.in

www.firstnaukri.com

www.freshnaukri.com

www.mysarkarinaukri.com

www.freshindiajobs.com

www.freshersopenings.in

www.freshersrecruitment.in

www.chennaifreshersjobs.com

www.govtjobs.allindiajobs.in

www.timesjobs.com

www.naukri.com

www.tngovernmentjobs.in

www.sarkariexam.co.in

www.govtjobs.net.in

www.indgovtjobs.in

Plzzz share......all grupsss